Tuesday 26 April 2016

मौन म्हणजे शब्दापासून शून्यापर्यंतचा प्रवास

२२ १० १९९७

      ‘जगावेगळं अध्यात्म’ – विमला ठकार यांचं पुस्तक वाचलं. त्यातलं मनानं टिपून घेतलं काही.. मौन म्हणजे शब्दापासून शून्यापर्यंतचा प्रवास. शब्द - नाद – आहत नाद – अनाहत नाद – शून्य. आहत म्हणजे घर्षण

      अहं ego म्हणजे somebodyness, somethingness, somebeingness… मौनात, शून्यात या अहंला स्थान नाही. कारण अहंचं अस्तित्व जे शब्द स्पर्श रस रूप गंध जाणीव यांच्यामुळे, यांच्या संदर्भातच आहे ते काहीच मौनात, शून्यात नाही. त्या भानरहीत अवस्थेत भीती वाटते. ज्याला लटकावं असा कुठलाच आधार न मिळून गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर भाररहीत अवस्थेत अधांतरी गटांगळ्या खाव्या तसा फील येऊन लगेच त्या अवस्थेतून अहं उसळून वर येतो. पटकन कशाचा तरी आधार घेतो. पण या अवस्थेला घाबरायचं कारण नाही. या अवस्थेतून खरंतर आपण रोज आपल्या नकळत जात असतो. रोज आपण झोपतो. त्या झोपेतला काही काळ अशा प्रगाढ निद्रेत.. शून्यावस्थेत जात असतो. त्यातून सुखरूप येतोच ना रोज स्वगृही परत? हा निद्रेत झालेला शब्दापासून शून्यापर्यंतचा प्रवास..! तोच जागृतावस्थेत केला की झाले...

      Living and dying from moment to moment... जीवन समग्र आहे. या सृष्टीतला प्रत्येक कण हा एकमेकाला जोडलेला आहे. त्यांच्यात परस्पर अभिमुखता- reciprocity.. mutuality आहे. निसर्गात एकप्रकारची व्यवस्था अंतर्निहीत आहे...

      परवाच एक कविता लिहिली. त्यात या interrelationचा संदर्भ आला. लिहिलंय - ‘कितना अद्‍भुत है / व्यष्टि का सृष्टी से / यह आंतरिक मेल..! असं काहीतरी जाणवावं आणि त्याचा तसाच उल्लेख वचनात, पुस्तकात मिळावा असं खूपदा होतं.. cosmic intelligenceचीच ही उदाहरणं असतील.

***

No comments:

Post a Comment