Wednesday 5 January 2022

माझ्या डायरीतून- २

१९.३.२००१

जगाविषयी.. घटनांविषयी.. इव्हन स्वतःविषयी आपली काही मतं असतात. ते सर्व ‘असं असं आहे’ असं आपण मानतो. अगदी घट्टपणे...

वस्तुस्थिती वेगळी, पूर्ण वेगळी असणं शक्य आहे. अगदीच शक्य आहे. ‘जग मिथ्या आहे’ असं तत्त्वज्ञानात म्हटलं आहे ते या अर्थी असेल.

वस्तुस्थिती आपल्या जागी स्थिर, निर्विकार... तिच्याकडे बघणारे असंख्य दर्शनबिंदू तिचे आकलन करतात आणि असंख्य वस्तुस्थिती निर्माण करतात.. ज्या त्यांच्यापुरत्या, त्या क्षणापुरत्या असतात..!

.....

विचार हा अवकाश-पक्षी आहे.

शब्दाच्या पिंजर्‍यात तो आपले पंख पसरवू शकेल

पण उडू शकणार नाही.

.....

आसावरी काकडे
६.१.२०२२

No comments:

Post a Comment